उपवासाचे आरोग्यदायी फायदे (Fasting Health Benefits)

शारीरिक आरोग्य 


प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत उपवास हा नियमित जीवनाचा एक धार्मिक आणि आध्यात्मिक भाग म्हणून ओळखला जातो. पूर्वजांनी आपल्याला जे नियम शिकवले ते आजच्या काळात विज्ञानाने ही सिद्ध केले आहेत. उपवास हा फक्त अध्यात्माचा भाग नसून, तो एक आरोग्य सुधारण्याचा नैसर्गिक मार्गही आहे. विशेषतः "इंटरमिटंट फास्टिंग" पद्धतीने उपवास केल्यास शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होताना आढळतात.

१. वजन कमी करणे आणि वजनाचे व्यवस्थापन.

• वजन कमी करणे हे आजच्या काळात  आपल्या समोर एक खूप मोठे आव्हान आहे. चुकीचा आहार, कमी शारीरिक हालचाली, नियमित व्यायामाचा अभाव आणि तणावपूर्ण जीवन यामुळे लठ्ठपणा वाढत रहातो. अशा परिस्थितीत उपवास हा एकमेव उपयुक्त मार्ग ठरतो.

• इंटरमिटंट फास्टिंगमध्ये आपण १६:८ किंवा १८:६ तासांची फास्टिंग विंडो ठेवतो. म्हणजेच १६ तास उपवासाची वेळ आणि ८ तास खाण्याची वेळ. या पद्धतीने शरीरातील साखर कमी होते आणि चरबी जळण्याची प्रक्रिया नित्य नेमाने सतत सुरू राहते.

• शास्त्रीय संशोधनानुसार, उपवासामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होते आणि शरीर आपली साठवलेली चरबी वापरात आणते. जेणेकरून शरीरात चरबीचे साठलेले थर विरघळत जातात आणि वजन कमी होते, तसेच  आपले स्नायू देखील लवचिक होतात. व्यक्तिमत्व आकर्षक होते.

. रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवता येते. 

• मधुमेह (डायबेटीस) हा आजार आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला दिसून येतो आहे. कित्येक तास बैठी कामं, ऑनलाईन खरेदी, सर्व कामांसाठी मशीनरीचा वापर, बाहेरून मागवलेलं खाणं इत्यादी अनेक कारणांमुळे चरबी न जाळली गेल्यामुळे हल्ली तरुण पिढीतही   मधुमेह फार मोठ्या प्रमाणात दिसू लागलेला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपवास अत्यंत हितकारी ठरतो.

• उपवासामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते आणि फास्टिंग ग्लुकोज कमी होते. हे विशेषतः टाइप २ डायबेटीस असणाऱ्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

• नियमित उपवास केल्यावर रक्तातील साखरेची पातळी सतत संतुलित राहते आणि औषधांवर अवलंबून रहाण्याची शक्यता फार कमी होते.

३. हृदयरोगांपासून संरक्षण मिळते. 

• उपवासामुळे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि साखरेचे प्रमाण यावर छान नियंत्रण मिळवता येते. या तिन्ही घटकांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी झालेला आढळतो.

• इंटरमिटंट फास्टिंग ही हृदयासाठी एक नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धत आहे, जी कोणत्याही औषधांशिवाय शरीर सुधारण्याची खूप छान संधी देते.

४. मेंदूचे आरोग्य आणि मेंटल क्लॅरिटी.

• उपवासामुळे BDNF (ब्रेन डिराइव्ह्ड न्युरोट्रॉफिक फॅक्टर) या मेंदूतील प्रथिनांचे उत्पादन वाढते. हे प्रथिन मेंदूच्या पेशींना संरक्षण देते, नवीन न्यूरॉन तयार करण्यास मदत करते आणि मेंदूची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या सुधारते. यामुळे लक्ष केंद्रित करणे, स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता वाढते.

• उपवासात मेंदू अधिक स्वच्छ आणि सतर्क राहतो, कारण पचनावर फारसा ताण नसल्यानं मेंदूला अधिक ऊर्जा मिळते.

५. पेशींची दुरुस्ती आणि ऑटोफॅजी

• ऑटोफॅजी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जिथे शरीर आपोआप खराब किंवा जुन्या पेशी नष्ट करून नवीन पेशींची निर्मिती होत रहाते.

• ही प्रक्रिया उपवासा दरम्यान खूपच ऍक्टिव होते. त्यामुळे कोशिकांची दुरुस्ती, डिटॉक्सिफिकेशन, आणि रोगप्रतिकारक शक्ती अतिशय उत्तम रित्या सुधारते.

• यामुळे शरीरातील सूज, ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी होतो आणि शरीर अधिक ऍक्टिव बनत जाते.

६. वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते 

• उपवासामुळे शरीरातील मेटाबोलिक आणि स्ट्रेस रेसिस्टन्स मार्ग पुन्हा ऍक्टिव होतात.

• उपवासामुळे निरोगी दिर्घायुष्य मिळते आणि वृद्धत्वाशी संबंधित आजारांपासून सहज संरक्षण मिळते हे आज शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे.

• उपवास एक प्रकारचा नैसर्गिक अँटी-एजिंग उपाय आहे. ज्यात वृद्धत्वाची प्रक्रिया क्रिया मंदावलेली आढळते.

७. मानसिक व भावनिक स्थैर्य

• उपवासामुळे मन स्थिर होते. सुरुवातीला थोडी चिडचिड किंवा थकवा जाणवू शकतो, परंतु काही दिवसांतच शरीर त्याला सवयीचे होते.

• मनाची शुद्धता, आत्मचिंतन आणि सकारात्मक विचार यासाठी उपवास उपयुक्त आहे.

महत्त्वाच्या सूचना:

• उपवास सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, विशेषतः जर आपल्याला मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड यांसारखे आजार असतील तर हा सल्ला घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

• उपवास करताना पाणी भरपूर प्यावे, आणि जेवणाच्या वेळेत पोषणमूल्य युक्त आहार घ्यावा.

• उपवासात संतुलन आणि नियमितता फार महत्त्वाची आहे. इथे अति उपवास टाळणेही महत्वाचे असते. याची नोंद घ्यावी.

निष्कर्ष

• उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग करून उपाशी रहाणे नव्हे, तर तो स्वतः हून स्वतःच्या चुकीच्या सवयींवर ठेवलेला ताबा आहे. निरोगी जीवनासाठी हाक मारणाऱ्या आपल्या शरीराचा आपण ऐकलेला तो मूक आवाज आहे.

• योग्य पद्धतीने आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केलेला उपवास हा आरोग्य आणि दिर्घायुष्यासाठी एक प्रभावी उपाय ठरतो. मग घेणार ना यापुढे स्वतः ची काळजी ? जागरूक राहणार ना योग्य उपवास करण्यासाठी ?

• सदर सविस्तर माहिती करिता गुगलचे आभार. फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपाय करावेत ही विनंती.

•आपल्या निरोगी दिर्घायुष्या करिता अनेक शुभेच्छा.  🌹

Comments